अक्षरब्रह्म प्राप्ती चे रहस्य
परतत्वाबद्दल भगवंतानी सांगितलेल्या उपदेशामुळे अर्जुन रणांगणापासून खूपच लांबवर आला होता. त्याने मुमुक्षित अवस्थेत प्रश्न विचारला, तो म्हणतो, "अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, ब्रह्म, धर्म, कर्म हे पारिभाषिक शब्द तुमच्या तोंडून मी ऐकले, पण त्यांचा नेमका आशय माझ्या ध्यानात येत नाही."
भगवान या संज्ञांचे विवेचन करताना म्हणतात, "अविनाशी, सर्वव्यापी अशी असलेली स्वतंत्र अशी गोष्ट म्हणजे ब्रह्म, त्याचा स्वभाव म्हणजे अध्यात्म, किन्कर्तव्यमग्न जगात उपभोगाच्या वस्तूंसाठी केलेली क्रुति म्हणजे कर्म होय. साकार वस्तूचे कायम बदलत असणारे स्वरूप म्हणजे अधिभूत, चन्द्र, सूर्य, अलौकिक गुण असणार्या व्यक्ती म्हणजे मंगल गोष्टींचे वैश्वीक रूप म्हणजे अधिदैव आणि त्यागाचा स्वामी म्हणजे अधियज्ञ."
पुढे भगवान असे म्हणतात की, "म्रुत्युसमयी जो माझे स्मरण करेल, तो नि:शंक पणे माझ्या जवळ येइल. अर्थात आयुष्य्भर ईश्वराशी अनुसंधान असल्याशिवाय म्रुत्युसमयी त्यांच्या ओठी हे स्मरण येणे अशक्यच."
एवढे सांगून भगवान श्रीक्रुष्ण युद्धभूमीवर असल्याची पुन्हा जाणीव करून देतात आणि म्हणतात, "तु ही माझे स्मरण कर आणि निष्काम भावनेने युद्ध कर, तु ही शेवटी मलाच येउन मिळशील" यानंतर भगवान दिवस-रात्र, शुक्ल्-क्रुष्ण पक्ष, दक्षिणायन - उत्तरायण यांच अवलोकन करतात. अखेरीस पापपुण्ययुक्त असलेली ही मर्त्य स्रुष्टी आपल्या साधनेने ओलांडून अक्षरब्रह्म पदाला पोहोचण्याचा उपदेश भगवंत अर्जुनाला करतात.
जे लोक कुठली इच्छा मनात धरून पुण्यकर्म करतात, ते पुण्यकर्माचे फळ संपून गेल्यावर पुन्हा जुने भोग भोगतात, या उलट जे सतत माझे ध्यान करतात, ध्यान करणे जर शक्य नसेल तर फळ, फूल, पान वाहून माझी पूजा अनन्यभावनेने करतात, ते लोक मलाच येवून मिळतात. तेव्हा अर्जुना तु तुझे मन माझ्या ठायी ठेव म्हणजे तू ही मलाच येवून मिळशील असा हा राजविद्या योग आहे.
परतत्वाबद्दल भगवंतानी सांगितलेल्या उपदेशामुळे अर्जुन रणांगणापासून खूपच लांबवर आला होता. त्याने मुमुक्षित अवस्थेत प्रश्न विचारला, तो म्हणतो, "अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, ब्रह्म, धर्म, कर्म हे पारिभाषिक शब्द तुमच्या तोंडून मी ऐकले, पण त्यांचा नेमका आशय माझ्या ध्यानात येत नाही."
भगवान या संज्ञांचे विवेचन करताना म्हणतात, "अविनाशी, सर्वव्यापी अशी असलेली स्वतंत्र अशी गोष्ट म्हणजे ब्रह्म, त्याचा स्वभाव म्हणजे अध्यात्म, किन्कर्तव्यमग्न जगात उपभोगाच्या वस्तूंसाठी केलेली क्रुति म्हणजे कर्म होय. साकार वस्तूचे कायम बदलत असणारे स्वरूप म्हणजे अधिभूत, चन्द्र, सूर्य, अलौकिक गुण असणार्या व्यक्ती म्हणजे मंगल गोष्टींचे वैश्वीक रूप म्हणजे अधिदैव आणि त्यागाचा स्वामी म्हणजे अधियज्ञ."
पुढे भगवान असे म्हणतात की, "म्रुत्युसमयी जो माझे स्मरण करेल, तो नि:शंक पणे माझ्या जवळ येइल. अर्थात आयुष्य्भर ईश्वराशी अनुसंधान असल्याशिवाय म्रुत्युसमयी त्यांच्या ओठी हे स्मरण येणे अशक्यच."
एवढे सांगून भगवान श्रीक्रुष्ण युद्धभूमीवर असल्याची पुन्हा जाणीव करून देतात आणि म्हणतात, "तु ही माझे स्मरण कर आणि निष्काम भावनेने युद्ध कर, तु ही शेवटी मलाच येउन मिळशील" यानंतर भगवान दिवस-रात्र, शुक्ल्-क्रुष्ण पक्ष, दक्षिणायन - उत्तरायण यांच अवलोकन करतात. अखेरीस पापपुण्ययुक्त असलेली ही मर्त्य स्रुष्टी आपल्या साधनेने ओलांडून अक्षरब्रह्म पदाला पोहोचण्याचा उपदेश भगवंत अर्जुनाला करतात.
जे लोक कुठली इच्छा मनात धरून पुण्यकर्म करतात, ते पुण्यकर्माचे फळ संपून गेल्यावर पुन्हा जुने भोग भोगतात, या उलट जे सतत माझे ध्यान करतात, ध्यान करणे जर शक्य नसेल तर फळ, फूल, पान वाहून माझी पूजा अनन्यभावनेने करतात, ते लोक मलाच येवून मिळतात. तेव्हा अर्जुना तु तुझे मन माझ्या ठायी ठेव म्हणजे तू ही मलाच येवून मिळशील असा हा राजविद्या योग आहे.